HW News Marathi
देश / विदेश

मनातील कटुतेला तिलांजली देण्याचा आजचा दिवस !

नवी दिल्ली। देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना म्हटले. मोदी पुढे म्हणाले की, या प्रकरणांवरून कोणाच्या मनात कटुता उरली असेल तर त्याला तिलांजली देण्याचा आजचा दिवस असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि मिळून जगण्याचा आहे. ९ नोव्हेंबर हा असा दिवस आहे की, या दिवशी बर्लिनची भींत कोसळली होती. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिशांच्या आहेत. आजची तारीख अयोध्या निकाल आणि करतारपूर कॉरिडॉरसाठी महत्वाची होती, असे मोदी यांनी देशवासियांना संबोधताना म्हटले.

अयोध्या प्रकरणावरील निकाल नवीन पहाट घेऊन आला आहे. या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला होता. मात्र, नव्या पिढीने नवी सुरुवात करावी, नवीन भारताची सुरुवात करावी. माझ्या सोबत चालणारा कुठे मागे तर राहिला नाही ना, याची दक्षता घ्यावी, असेही मोदी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, असा निकाल दिला आहे. अयोध्या प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एकमताने झाला असून राम मंदिरसाठी राम ट्रस्ट स्थापन करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे. आणि न्यायालयाने रामलल्लाचे अस्तित्त्व मान्य केले आहे. तसेच मुस्लिमांना अयोध्येत ५ एकरी पर्यायी जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

या पाच न्यायमूर्तींनी दिला ऐतिहासिक निर्णय

अयोध्या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने निकाल दिला आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

swarit

उमर खालिदला अटक, दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा ठपका

News Desk

Kathua Rape Case : पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीच महिला वकिलाला हटवले

News Desk