HW News Marathi
Covid-19

“…तर आपल्याला लॉकडाउन टाळताच येणार नाही”, आयुक्तांनी दिला इशारा  

मुंबई | मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. चाचण्याच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढेल असून, मुंबईतील पॉझिटिव्ही रेट काही दिवसांतच चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मागील पंधरा दिवसांत मुंबईतील रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून, महापालिकेच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईकराना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीसंदर्भात भाष्य केलं आहे. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल बोलताना आयुक्त चहल म्हणाले,”वाढत्या रुग्णसंख्येमुळे धोका आहे. नागरिकांनी शिस्त पाळली नाही आणि आता हजारो लोकं विनामास्क फिरताना दिसत आहे. काल (२१ फेब्रुवारी) आम्ही १६ हजार ४०० लोकांकडून दंडवसुल केला. मागील तीन महिन्यात १६ लाख लोकांना दंड आकारला आहे. आता दररोज विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या २५ हजार लोकांकडून दंड वसूल करण्याचं उद्दिष्ट्य देण्यात आलं आहे,” अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.

“माझ्याकडे दोन व्हिडीओ आलेत. एक व्हिडीओ चौपाटीवरचा होता. हजारो लोकं तिथं होते. तिथे विनामास्क लोकं फिरत होते. एक लग्नातील व्हिडीओ आला. तिथंही हेच दृश्य होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दंड ठोठावला. अनेक ठिकाणी पबवरही धाडी टाकल्या. हा सगळा बेशिस्तपणा आहे,” अशा शब्दात आयुक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“कोरोना संपला आहे, असं लोकांना वाटत आहे आणि लोकं जसं वागत आहेत, ते फार धोक्याचं आहे. त्यामुळे लॉकडाउन होणार की नाही हे लोकांनी ठरवायचं हे मुख्यमंत्री योग्यच बोलले आहेत. लोकांनी शिस्त पाळायला हवी. मास्क वापरायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. लग्न समारंभात लोकांनी गर्दी केली नाही, तर लॉकडाउनची वेळ येणारच नाही. पण, हजारोंच्या संख्येनं लोकं विनामास्क बाहेर फिरायला लागले, तर आपल्याला लॉकडाउन टाळताच येणार नाही. मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत,” असा इशारा आयुक्त चहल यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण!

News Desk

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे !

News Desk

देशात २४ तासात ३२,६९५ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर, ६०६ जणांचा झाला मृत्यू

News Desk