HW News Marathi
महाराष्ट्र

सिंचनासाठी महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटींची मदत | नितीन गडकरी

नवी दिल्ली | राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्रासाठी १ लाख १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा बुधवारी झाली आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बळीराजा संजीवनी योजने अंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

गडकरी म्हणाले, पावसाळा संपताच सिंचन प्रकल्पाला सुरुवात होईल. राज्यातील ९१ प्रकल्पांसाठी केंद्राची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे राज्याची सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे. सिंचन क्षमतेतही यामुळे वाढ होणार असून सिंचन १८ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांवर जाणार आहे. तसेच या प्रकल्पात सातारा, सांगली आणि बुलढाण्यातील प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती गडकरीनी दिली. केंद्राच्या मदतीमुळे सिंचनक्षेत्र 40 टक्के वाढेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भंडारा घटनेतील मृत बालकांच्या पालकांना ५ लाखांची मदत जाहीर – राजेश टोपे

News Desk

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या!

News Desk

मला राजीनामा देण्याचा सल्ला देण्याऐवजी तुम्हीच … ! पुण्याच्या महापौरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला

News Desk
महाराष्ट्र

पीएमपीची मोबाईल-ॲप आधारित कुरियर सेवा

News Desk

मुंबई | पेपरं एन पार्सलने नुकतेच मोबाईल ॲप आधारित कुरियर सेवा लॉन्च केली असून या सेवेद्वारे शहरातील इतर कुरियर सेवांच्या तुलनेत स्थानिक पार्सल वितरणाचा खर्च कमीत कमी एक चतुर्थांश आणि कमी झाला आहे. १३ वर्षाच्या टिळक मेहता यांच्या कल्पनेने ही ॲप आधारित कुरियर सेवा मुंबई शहराच्या हद्दीत दररोज ग्राहकांच्या दरवाज्यात पोहोचण्यासाठी ५००० पुरस्कार विजेत्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या नेटवर्क मार्फत देत आहे.

डबेवाल्यांचे अन्न वितरण नेटवर्क जगातील सर्वात कार्यक्षम सेवनपैंकी एक आहे. त्यामुळे मुंबई शहरातील पार्सल वितरित करण्यासाठी मला हे नेटवर्क वापरायचे होते, अशाप्रकारे शहराच्या हद्दीतील कुरियर सेवा अधिक कार्यक्षम होऊन त्यावरील खर्च आटोक्यात येईल. सहसा स्थानिक कुरियर पाठविण्याची किमान किंमत सुमारे दीडशे ते दोनशे रुपये आहे. पेपर पार्सल मोबाईलचा वापर केल्याने या कुरियरचा किमान दर सुमारे 40 ते 50 रुपये आहे.

तसेच पेपर एन पार्सल कुरियर डिलिव्हरीसाठी स्पर्धात्मक किंमतीसह, विना अडचण मोफत डिलिव्हरी, डोअर टू डोअर पिकप सुविधा, युजर फ्रेंडली आणि थेट ग्राहक सेवा व हेल्पलाइनची सेवा तसेच वेबसाइटवर आपल्या ऑर्डर देखील नोंदवू शकतात. असे पेपर एन पार्सलचे संस्थापक टिळक मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कंपनीचे सीईओ घनशाम पारेख आणि मुंबई डबेवाल्यांचे प्रवक्ता सुभाष तळेकर देखील उपस्थित होते.

Related posts

“चंद्रकांतदादा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी”, अजित पवारांनी लगावला टोला

News Desk

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

News Desk

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

News Desk