HW News Marathi
मुंबई

वाहतूक विस्कळीत झाल्याने डबेवाल्यांची सेवा बंद

मुंबई | वर्षभर अविरतपणे आपले काम करणा-या मुंबईच्या डबेवाल्यांनी मंगळवारी आपली सेवा बंद ठेवली आहे. मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले पुलाचा अचानक काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा खंडीत झाली. त्यामुळे उपनगरातून शहरात येणारे अनेक डबेवाले जागो जागी रेल्वे स्थानकात अडकून पडले. लोकलच्या विस्कळीत झालेल्या वाहतूकीमुळे वेळेत डबे पोहचविणे शक्य नसल्यामुळे मंगळवारी मुंबईच्या डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशन कडून जाहीर करण्यात आले.

डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर एच डब्लू मराठी शी बोलताना म्हणाले, अनेक डबेवाले अंधेरी ते विरार येथे अडकल्यामुळे डबेवाल्यांची सप्लायचैन खंडीत झाली आहे. त्यामुळे आज डबेवाल्यांची सेवा बंद रहाणार आहे. तसेच घरातून डबे घेऊ नयेत व घेतले असल्यास परत द्यावेत अशा सुचना डबेवाल्यांना देण्यात आल्या आहेत असेही ते यावेळी बेलताना म्हणाले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ब्रेक, वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

टॅक्सी चालकावर ‘मनसे स्टाईल’ कारवाई, रस्त्यावर उठाबश्या काढण्याची शिक्षा

News Desk

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Gauri Tilekar
मुंबई

अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

News Desk

मुंबई | पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनजवळ असलेल्या पादचारी पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला. हा पुल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला पहायला मिळत आहे. या घटनेमुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती सध्या समोर आली आहे. 7.35 वाजण्याच्या सुमारास हा गोखले पूल कोसळला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी कार्यालयात जाणा-या चाकरमान्यांची घाई असते अशा वेळी हा पुल कोसळल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related posts

कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तांत्रिक बिघाड, वाहतूक २० मिनिटे उशिराने

News Desk

लाईफलाईन ठरतेय डेथलाईन

Arati More

Dahi Handi | ठाण्यात पहायला मिळणार प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार, 10 थरांसाठी 21 लाखांच बक्षीस

News Desk