HW News Marathi
Covid-19

महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे का ? संजय राऊत म्हणतात

मुंबई | राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. काल (२५ मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांनतर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये बैठक झाली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल दिड तास चर्चा झाली अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे .

दरम्यान काल नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे . त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांनाही टोला लगावला आहे. ‘मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे. राज्यातील कोरोनाचा संकटाचा सामना करण्याबाबत राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्याची शक्यता असल्याने तसेच केंद्र सरकारने काही पावले उचलल्यास रणनिती आखण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीचे अधिक महत्व वाढल्याचे दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वानखेडे मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही | आयुक्त

News Desk

जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावे, आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

News Desk

मुंबईची चिंता वाढली! आज तब्बल ६ हजार ३४७ नवे कोरोना रुग्ण

Aprna