HW News Marathi
महाराष्ट्र

“वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले हे चुकीचे” – नवाब मलिक

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा – वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले हे चुकीचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. पावणेतीन कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

जर पहिल्यांदा लसीकरण केले असते तर लोकांना जास्त लाभ झाला असता

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जर पावणेतीन कोटी लसीकरण काल झाले तर आज आणि उद्या का नाही असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. जर पहिल्यांदा लसीकरण केले असते तर लोकांना जास्त लाभ झाला असता मात्र एखाद्या व्यक्तीच्या ‘महिमा’ साठी अशाप्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी देशातील कोरोना लसीकरणाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शुक्रवारी जवळपास 2.50 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत. याआधी एका दिवसात 1.33 कोटी डोस देण्याचा रेकॉर्ड होता. आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की शुक्रवारी लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन कोटी डोस दिले गेले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी लसीकरणाची माहिती घेण्यासाठी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाचा दौराही केला. ज्यावेळी ते आढावा घेण्यासाठी गेले तेव्हा देशानं दोन कोटी डोसचा आकडा पार केलेला.

भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती

या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 कोटी लसी वितरित केल्या होत्या. तो विक्रम भारताने मोडला आहे. भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार

News Desk

आपल्या पाल्याला कोरोना होण्याची भीती असेल तर शाळेत पाठवू नये – अदिती तटकरे

News Desk

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत!

News Desk