HW News Marathi
महाराष्ट्र

कोविडच्या परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुखांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा!

सांगली | देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रसरकारवर केला आहे.

देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. अनिल देशमुख यांच्या मागे लागण्यापेक्षा हा वेळ जर कोविडला भारतातून बाहेर काढण्यासाठी दिला असता तर चांगली परिस्थिती देशात राहिली असती अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेली एफआयआर ही अंत्यत भोंगळ स्वरूपाची आणि मर्यादेचा भंग करून जे सांगितले नाही त्या विषयाला स्पर्श करणारी ही एफआयआर आहे. सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे.सीबीआयचा राजकीय वापर होतोय असेही जयंत पाटील म्हणाले.

देशात मोघलाई लागलीय असे वाटावे असा हा आज अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईच्या प्रकारावरून वाटते. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल, त्यामुळे एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठीच आधी एफआयआर दाखल केली मग छापेमारी सत्र सुरू केले असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू | मुख्यमंत्री

News Desk

घराला घरपण देणाऱ्या डिएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल

News Desk

“आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका” महापौरांचा इशारा !

News Desk