HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची राहुल गांधींवर टीका!

मुंबई। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भर सभेत काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. भर सभेत जनतेशी संवाद साधताना दानवेंनी राहुल गांधींवर जहरी टीका केली आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद उफाळण्याची शक्यता आहे. राव साहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा बदनापूर या गावात पोहचली होती आणि त्या गावात दानवेंची सभा सुरु होती. या सभेत दानवेंनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधत खासदार राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

राहुल गांधींवर विखारी टीका

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान बदनापूरमध्ये रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दानवेंनी कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला. या सभेत राहुल गांधींवर विखारी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कौतुकाची सुमने उधळत असताना काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी कसे निरुपयोगी आहेत असं सांगताना विखारी शब्द वापरला आहे. या शब्दामुळे रावसाहेब दानवेंचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे.

देवाला सोडलेला सांड जसा असतो तशाच स्वरुपाचे राहुल गांधी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलत असताना म्हटल आहे की, देवाला सोडलेला सांड जसा असतो तशाच स्वरुपाचे राहुल गांधी आहेत. ते कोणाच्या कामालाही येत नाहीत. राहुल गांधी कोणाचे काम करु शकत नाहीत. मात्र नरेंद्र मोदी हे देशामध्ये चांगलं काम करत आहेत. असं सांगताना राहुल गांधींवर टीका केली आहे. मात्र असं करत असताना रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर खालच्या पातळीवर टीका केली आहे.

गलिच्छ राजकारण फक्त शिवसेना करु शकते

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेपुर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार असल्याचे जाहीर केलं होते. राणेंना दर्शन घेऊन देणार नाही असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र नारायण राणेंना बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यापासून रोखण्याचा इशारा द्यायला नको होता. असं गलिच्छ राजकारण फक्त शिवसेना करु शकते अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेहुल चोक्सीप्रमाणे नील आणि किरीट सोमय्या देखील देश सोडून पळून गेले?, राऊतांचा सवाल

Aprna

बँकिंग कायदा दुरुस्तीविरोधात लढा उभारा, शरद पवारांचा केंद्रविरुद्ध लढा

News Desk

अनिल देशमुखाना मोठा दिलासा! जामीनाविरोधातील CBIची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna