HW News Marathi
महाराष्ट्र

“मी गृहमंत्री होणार या बाजारातल्या गप्पा…”, जयंत पाटील यांनी केला खुलासा

मुंबई | सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोर बैठका सुरू आहेत. अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील यांच्याकडे गृहखातं देण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता, या बाजारातल्या गप्पा असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज (१७ मार्च) समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी तुम्ही गृहमंत्री होणार असल्याच्या चर्चा असल्याचं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा, या बाजारातल्या गप्पा आहेत. अशा चर्चांवर विश्वास ठेवू नका, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि आमदार निधींबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर विषयांवर चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. या बैठकीत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलण्यात येणार असल्याची चर्चा झाल्याचं समजतं. त्याबद्दल काय सांगाल, असं पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, या बैठकांना मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे मला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेची गृहखात्यात ढवळाढवळ वाढल्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. अनिल परब हे गृहखात्यात ढवळाढवळ करत असल्याने शरद पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा अशी बातमी माझ्यापर्यंत आली नाही. गृहमंत्र्यांनी अशी तक्रार केलेली आहे, याची मला माहिती नाही, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकत्रित काम करत आहेत. काहीच मतभेद नाहीत. प्रशासकीय बदल्यांचे निर्णय दोन्ही नेते घेत असतात. प्रशासकीय कामाबाबत नाराजी असण्याचं कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना लसीकरणावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोना लसीकरणाचा आकडा माझ्याकडे नाही. आरोग्य मंत्रीच त्याबाबत अधिक माहिती देऊ शकतील. परंतु, भारताने तयार केलेली ही लस आहे. असं असतानाही ज्यांनी भाजपला निवडून दिलं त्या भारतीयांचं लसीकरण करण्यात आपण स्लो आहोत. परदेशात आपण लस पाठवतो. पाकिस्तानसह परदेशात लस पोहोचवली जात आहे. पाकिस्तानला लस देत असल्याबाबत केंद्र सरकारच्या दानशूरपणाचं कौतुकच आहे. भारतीय लोक लसीकरणात मागे राहिले तरी चालेल, अशीच केंद्राची मानसिकता दिसत आहे, असं सांगतानाच भारतीयांची काळजी घेण्याऐवजी पाकिस्तानी जनतेची काळजी का? याचं आधी उत्तर जावडेकरांनी दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रोज आमचा एक नेता उठतो आणि सरकार पडणार सांगतो….”, पंकजा मुंडेंनी दिला भाजपाला घरचा आहेर

News Desk

“नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही”

News Desk

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांची दणक्याने सुरूवात,सुजित मिणचेकर विजयी !

News Desk