HW News Marathi
महाराष्ट्र

‘दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश ‘-जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई | राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा एका मागोमाग एक महत्वपूर्ण निर्णय घेत कामाचा धडका सुरूच आहे. आज त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे जाहीर करत स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

वारणा प्रकल्पाच्या मंजूर बिगर सिंचन तरतूदीतील विनावापर ६ टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी देण्याचे आदेश जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळवण्यात आले आहे. यावर अधिक माहिती जयंतराव पाटील यांनी ट्विट करत दिली आहे.

गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील ६५ गावे पाण्यापासून पुर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी एकूण ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत बुधवारी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळविण्यात आलेले आहे.

अनेक वर्षांपासून या गावांना पाणी द्यावे, अशी मागणी होती. त्याअनुषंगाने आज आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विस्तारीत म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे आदरणीय राजारामबापूंचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण होत आहे याचा मला व सांगली जिल्हावासीयांना मोठा आनंद आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी; कोणतीही विदेशवारी न करता महिलेने गमावला जीव

Aprna

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीची उद्धव ठाकरेंना होती कल्पना?

News Desk

अर्थसंकल्पात ठाकरे सरकारने ‘स्टॅम्प ड्युटी’मध्ये दिली ऐवढी सवलत

swarit