HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांना भेटलं तर त्यावर विश्लेषण करण्यासाठी आपला वेळ वाया का घालवा?

मुंबई | विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकासआघाडीसारकारकडून नुकतीच १२ नावांची शिफारस यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. दरम्यान, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.”आमचा राज्यपालांवर पूर्ण विश्वास आहे. आता, कोणाकडे काही काम नाही आणि कोणी राज्यपालांना भेटलं तर त्यावर विश्लेषण करण्यासाठी आपला वेळ वाया का घालवा?” असा बोचरा टोला लगावला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना नाव न घेता लगावला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अर्णव गोस्वामी यांच्यावर कोणत्याही आकसापोटी कारवाई केलेली नाही. अण्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानं ही कारवाई केली गेली आहे. दरम्यान, पोलीस योग्य कारवाई करत आहेत. या साऱ्या प्रकरणात शरद पवारांचे काही फोटो फिरत असतील तर त्याबद्दल मला माहित नाही. ते ऑर्फ केलेले असू शकतात असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी नाणारपासून ते मंदिर सुरु करण्यापर्यंत महाविकास आघाडीचं मत सांगितलं. नाणारविषयी जयंत पाटील म्हणाले की, नाणार इथल्या जनतेचा विरोध पाहूनच नाणार रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता. जनतेच्या विरोधात कोणताही निर्णय होणार नाही असं जयंत पाटील यांना स्पष्ट केलं आहे. नाणार समर्थक भेटायला आल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नावेत बसून सेल्फी काढणे बेतले जीवावर

News Desk

‘बंगालमध्ये मी तीन आमदार निवडुन आणले’ भाजपच्या गिरीश महाजनांचा दावा !

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब घेणार पुन्हा बैठक!

News Desk