HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्र्यांचा जर एकेरी उल्लेख केला असता तर…जयंत पाटलांचा टोला 

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात वादावादी सुरुच आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने काल (९ सप्टेंबर) हातोडा मारला. या कारवाईवरून सत्ताधारी पक्षावर टीका करण्यास सुरुवात झाली. अशात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मात्र, टीका करताना फडणवीस यांनी हिंदीतून भाष्य केले. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

“एखाद्याने प्रसिद्धीसाठी विधानं केली, तर प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करावे, कशाला किती महत्त्व द्यायचे? याला काही मर्यादा आहेत. राज्यातील प्रमुखांबाबत अशी भाषा वापरणे हे जनतेला मान्य आणि सहन होणार नाही” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांचा कोणी एकेरी उल्लेख केला असता, तर तेही मान्य केलं नसतं, असे जयंत पाटील म्हणाले.

कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईला बीएमसी उत्तर देईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रकरणावरुन नाराज आहेत, हे तुम्ही सांगितल्यावर समजलं. माझ्या माहितीत असं आलेलं नाही, असेही ते म्हणाले. कंगनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या बाजूने बोलण्याची अपेक्षा आहे, मात्र भाजप नेते ती पूर्ण करत नाहीत. कोण कुणाला समर्थन देत आहे मुद्दामहून, हे महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. कंगनाचा बोलविता आणि करविता धनी कोण आहे, हे दिसत आहे. तिच्या मागे कोणता पक्ष आहे, हे आता स्पष्ट झालं आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.p

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी; संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून ऊसाच्या शेतामध्ये केली आत्महत्या

Aprna

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता धवलसिंह मोहिते पाटील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

जालन्यात १ कोरोना पॉझिटीव्ह, दादरच्या पोलिस स्टेशनमधील हा कर्मचारी आहे

swarit