HW News Marathi
महाराष्ट्र

“आंबे खाल्यावर मुलं होतात हे सांगणाऱ्यांनी…”जयंत पाटलांनी संभाजी भिडेंना खडसावलं!

सांगली | कोरोनाच्या कठीण काळात सरकार, नागरिकांमध्ये चिंता वाढत चालली असताना संभाजी भिडे यांनी कोरोनाच्या बाबतीत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले होते. कोरोना हा मुळात रोजच नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. संकट टाळण्यासाठी राज्य सरकार आणि समाज एकत्र मिळून प्रयत्न करत असताना दिशाभूल करणारी वक्तव्यं करणे अयोग्य आहे. अशा प्रकरणात तपासणी करुन आवश्यकता वाटल्यास वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांना इशारा दिला.

आज (११ एप्रिल) सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटकाळात समाजात गैरसमज पसरवणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा रोखठोक इशारा संभाजी भिडे यांना दिला आहे. सध्या अनेकांना कोरोनाची बाधी झाली आहे. एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात अशाप्रकारची वक्तव्य करुन लोकांना वेगळ्या दिशेला नेणे अयोग्य असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

सध्या राज्य सरकार आणि समाज कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील तर ते अयोग्य आहे. एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या कोरोनाच्या गंभीर आणि महत्वाच्या काळात अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचं गांभीर्य कमी होतं. कोणीही उठून काहीही बोलायला लागलं तर सरकार आणि समाजाकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होईल. त्यामुळे अशी वक्तव्यं कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हणाले आहेत. तसेच संभाजी भिडे पुन्हा अशाप्रकारचं धाडसी विधान करणार नाहीत, अशी आशाही यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

“मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो मानसिक आजार आहे,” असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. संभाजी भिडे म्हणाले की, “समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दुशासन होता कामा नये, निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. शासनाचे निर्णय घातकी आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही.”

“लॉकडाऊनमध्ये खासदार आणि आमदारांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत, असलं सरकार फेकून दिल पाहिजे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.

“कोरोना हा रोगच नाही. दारु दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठ्या मारतात,” असं भिडे गुरुजी म्हणाले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारही जबाबदार आहे. कोरोनाच्या बाबतीत देशात खेळखंडोबा चालू आहे, जे जगायचे ते जगातील जे मरायचे ते मरतील, असं असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलं. तसंच मिलिट्रीला आपण काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात लवकरच शाळा होणार सुरु, सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

News Desk

आमचे खत चांगले आहे, महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार !

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या वेळवरून शिवप्रेमीमध्ये नाराजी

Aprna