HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढवण्याबाबत जयंत पाटील म्हणतात …

मुंबई | आज महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.केंद्राकडुन महाराष्ट्राला विशेष मदत तर नाहीचं पण हक्काचे पैसेदेखील मिळाले नाहीत असा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी लॉकडाऊन संदर्भात देखील महत्वाचे विधान केले.

महाराष्ट्रात सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन ४ सुरु आहे. पण सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन हा शब्दप्रयोग न करता काही गोष्टी कशा पुर्वपदावर आणता येतील याचा विचार करुया असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केले होते. दरम्यान राज्यातील लॉकडाऊन वाढणार की नाही हा प्रश्न विचारला जातोय.

जयंत पाटील यांनी सांगितल्यानुसार येत्या२९ तारखेला लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. बरीच स्थिती आटोक्यात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जिथे कोविड रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत, तिथेले व्यवहार सुरळीत करण्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले. पण जिथे रुग्णसंख्या जास्त आहे तिथे शिथीलता दिली जाणार नसल्याचे सुद्धा त्यांना स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी यांची निवड

News Desk

अनिल देशमुख म्हणतात, “दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे!”

News Desk

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही; 29 तारखेपर्यंत कारागृहातच रहावे लागणार

Aprna