HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ता मिळवण्यासाठी भाजपने रामाचे नाव घेऊन काय काय केले, आव्हाडांची टीका

नाशिक | ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. रामाच्या नावे राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी असेही ते म्हणाले.

“प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे.”

“मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो…त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचं एवढं काही नाही…त्यांना वाटतंय ते करत आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.गेली ४० वर्ष भाजपाने प्रभू रामाच्या नावावर राजकारण केलं, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी केलं,” असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मिंधे सरकारमध्ये एवढी धमक उरली आहे काय?”, सामनातून हल्लाबोल

Aprna

होळी घराच्या दारात पेटवायची नाही, मग काय घरात पेटवायची? भाजपचा सरकारला सवाल

News Desk

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का!

News Desk