HW News Marathi
महाराष्ट्र

अभियंताला मारहाण केल्याप्रकरणी सोशल मीडियावर आव्हाडांना अतिशय खालच्या भाषेत केले ट्रोल

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत एका तरुणाला मारहाण केल्याने राजकीय वर्तृळात प्रचंड गदारोळ झाला आहे. देशात एकीकडे लॉकडाऊन असताना तरुणाला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्यामूळे विरोधी पक्षाकडून आव्हाडांवर टीकास्त्र सुरु आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे शासनकर्तेच अशी मारहाण करतील तर कायद्याचे राज्य अस्तित्त्वात राहणार नाही असे ट्विट केले होते.

तर आता त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. मात्र, मारहाणीवर मौन सोडत आव्हाडांनी असे सांगितले की, हा अभियंता गेली ३ वर्षे नको नको त्या पोस्ट माझ्या विरोधात करत होता.

दरम्यान, अनेकांनी आता सोशल मीडियावर आव्हाडांना धमक्या देणे, ट्रोल करणे या सगळ्याची सुरुवात केली आहे. आम्ही तुमचा दाभोळकर करू, अशा धमक्या त्यांना सोशल मीडियातून दिल्या जात आहेत. तसेच, त्यांच्या कुटुंबीयावरही खालच्या भाषेत शिवीगाळ केला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याच नावाने फेक अकाऊंट तयार करुन या धमक्या दिल्या जात आहेत.

काय होते प्रकरण?

गेली ३ वर्षे हा अभियंता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करत होता. परंतू, आव्हाडांनी दुर्लक्ष केले होते. दरम्यान, पीडित तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे की, ५ एप्रिल रोजी रात्री ११-१२ च्या सुमारास दोन साध्या वेषातील तर दोघे वर्दीवरील पोलीस त्यांच्या कावेसर येथील घरी आले. त्यांनी कोणतेही कारण न सांगता पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली बाहेर येण्यास फर्मावले. कारण विचारल्यानंतर मात्र दहा मिनिटांमध्ये आणून सोडतो, असे त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेत एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेण्यात आले. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या १५ ते २० जणांनी पोलिसांकडे असणारी फायबर काठी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर आणि मांड्यांवर जबर मारहाण केली. त्यानंतरही लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागणार नाही, याची दक्षता घ्या, असेही घेऊन येणारे पोलीस त्याठिकाणी बजावत होते. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या करमुले यांना फेसबुकवर पोस्ट का टाकली, अशी विचारणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलच, पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती!

News Desk

राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यात शिवसेनेच्या मंत्र्याचा हस्तक्षेप?

News Desk

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे: आठवले

News Desk