HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन वाढणार का ?

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाची संख्या १००० च्या पुढे गेली आहे. तसेच, आणखी चिंतेची बाब म्हणजे मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. काल (७ एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केशरी रेशकार्डधारकांना अनुदानित अन्नधान्य पुरवले जाणार आहे तर शिवभोडन थाळी ३ महिने ५ रुपयांत दिली जाणार, असे हे २ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर दुसरीकडे, देशातला लॉकडाऊन जरी १४ एप्रिलला संपत असला तरी मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यताही वर्वतवली जात आहे.

१० एप्रिलला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आढावा घेतल्यानंतर १४ एप्रिलला अंतिम निर्णय देण्यात येण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच, ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त नाही आहेत त्या भागातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येऊ शकते. दरम्यान, जिल्हाबंदी कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.तसेच, देशाची अर्थव्यवस्था आणि इतर क्षेत्रांवर पडत असलेला प्रभाव पाहता लॉकडाऊन वाढण्याच्या स्थितीत काही दिलासा दिला जाऊ शकतो. जे लोक सध्या विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या ठिकाणावर पोहोचवले जाऊ शकते. पण ज्यांच्यावर उपचार किंवा कायदा-सुव्यवस्थेशी निगडीत लोकांना जिथे आहे तिथेच ठेवले जाऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’, निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

swarit

सेना-भाजप विधानपरिषदेची निवडणूक एकत्र लढवणार

swarit

सावधान! स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंगच

News Desk