HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी !

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवरील केलेल्या टिकेनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. तसेच, अनेकांनी तिला मुंबईत येण्याचा किंवा राहण्याचा हक्क नाही असे म्हणत विरोध केला. यासर्व विरोधानंतर कंगनाला आता उपरती झाल्याचं चित्र आहे. “मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी आहे”, असे ट्वीट कंगनाने केले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301921290748456965?s=19

“महाराष्ट्रासह माझ्या सर्व मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे आणि मला माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबाबत माझं प्रेम सिद्ध करायची गरज नाही, जिने मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, जय मुंबई जय महाराष्ट्र”, असं ट्वीट कंगनाने केले आहे.

अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीका केली जात होती. शिवसेना, काँग्रेस, मनसे या सर्व पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिले. शिवसेनेच्या महिला आघाडीने तर कंगनाचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा नवयुवकांसाठी संधी; नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे! – नरेंद्र मोदी

Aprna

‘भारत बंद’ हा कोणताही राजकीय बंद नाही – संजय राऊत

News Desk

अर्णब गोस्वामींचे ‘ते’ चॅट गंभीर, राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – गृहमंत्री

News Desk