HW News Marathi
महाराष्ट्र

सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? – कंगना राणावत

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. त्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. या वादात आता अभिनेत्री कंगना राणावत हिने उडी घेतली आहे. अनेक विषयांवरुन ती वारंवार राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताना दिसत आहेच. या प्रकरणावरुन तिने एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

कंगना म्हणाली की, “मी महाराष्ट्र सरकारला एक विचारु इच्छिते की अर्णब गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे आणखी किती घरं तुम्ही तोडणार आहात? आणि किती जणांचे गळे दाबण्याचे आहात? आणि किती जणांचे आवाज बंद करणार आहात? सोनिया सेना आणखी किती जणांची तोंडं बंद करणार? एक आवाज बंद केला तर दुसरा आवाज येईल. आणि तुम्हाला राग कसला येतो? पेंग्विन म्हटल्याचा राग येतो? आता पेंग्विन दिसत असेल तर बोलणार. पप्पू सेनेसारखे काम केले तर पप्प सेना बोलणारचं आणि तुम्ही सोनिया सेना आहात”, असे ट्विट कंगनाने केले आहे. कंगनाने नाव न घेता मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1323830723032215552?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा’, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार !

News Desk

नवापूर मध्ये शेकडो शिवसैनिक भाजपात सामील

News Desk