HW News Marathi
महाराष्ट्र

लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु आहे, कंगणाचे मुंबईतून निघतानाचे ट्विट

मुंबई | मुंबई, महाराष्ट्राविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतला अनेक स्तरांतून विरोध करण्यात आला. शिवसेनेत आणि कंगनात सातत्याने एकमेकांना निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमिवर काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या कंगनाने अखेर मुंबई सोडली आहे. आणि मनालीच्या दिशेने रवाना झाली आहे. कंगनाने ट्विट करत अतिशय जड अंतःकरणाचे मुंबई सोडत असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1305343873103859713?s=19

“ज्यावेळी रक्षकच भक्षक झाले आहेत. लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु आहे. मला कमकुवत समजून तुम्ही फार मोठी चूक करत आहात’, असं ट्विट तिने केले आहे. मुंबईतून काढता पाय घेताना आपण, जड अंत:करणाने शहर सोडत असल्याचे ती म्हणाली. मला ज्या प्रकारे घाबरवण्यात, धमकवण्यात आलं, माझ्यावर हल्ले झाले, शिवीगाळ करण्यात आली. राहतं घर, कार्यालय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत आपल्याभोवती शस्त्रास्त्र आणि सुरक्षा रक्षकांचा वेढा होता त्यामुळं POK बाबत आपण केलेले वक्तव्य योग्य होते”, असे ठाम मत तिने मांडले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत देणार

News Desk

‘जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधले असा प्रकार केंद्राने करून ओबीसींची शुद्ध फसवणूक केली’ -शरद पवार

News Desk

“आपली सर्वोच्च न्यायसंस्था खरंच स्वायत्त आहे काय?” – सामना

News Desk