HW News Marathi
महाराष्ट्र

‘लोकल ट्रेनचा पास मिळवण्यासाठी इतक्या अटी का?’, केशव उपाध्येंचा सवाल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ‘लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची प्रक्रिया किचकट करून राज्य सरकार मुंबईकरांची ‘लोकल कोंडी’ करीत आहे. कमीत कमी मुंबईकरांनी लोकलमधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा दिसते,’ अशी शंका भारतीय जनता पक्षानं व्यक्त केली आहे.

राज्य सरकारनं सुरू केलेली प्रक्रिया अत्यंत किचकट

सरकाने रेल्वे सुरु करावी म्हणून भाजपने आंदोलनं केली होती. या आंदोलनामुळं राज्य सरकारला जाग आली आणि १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ही परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यामुळं पहिल्या दिवशी अवघ्या २० ते २२ हजार मुंबईकरांना ही परवानगी मिळवता आली. प्रवासाची परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारनं ज्या अटी घातल्या आहेत, ते पाहता दोन डोस घेतलेल्या सर्व मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी केव्हा मिळणार,’ असा सवाल उपाध्ये यांनी केला. ‘आधीच अनेक निर्बंधांनी वैतागलेल्या सामान्य मुंबईकरांची लोकल कोंडी करणं राज्य सरकारनं थांबवावं, असं आवाहनही उपाध्ये यांनी केलं आहे.

मंदिरांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत

१५ ऑगस्ट पासून राज्यात निर्बंध शेतहूल करण्यात आले असले तरीही धार्मिकस्थळे अजूनही बंदच आहेत. श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मंदिरांवरील निर्बंध उठविण्याची गरज होती. मात्र, हे निर्बंध कायम ठेवून आघाडी सरकारनं आपल्याला हिंदूंच्या भावनांशी देणंघेणं नसल्याचंच दाखवून दिलं आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. ‘आघाडी सरकारनं शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत १५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय होऊ शकला नाही यावरून हे सरकार शिक्षण सम्राटांच्या हिताला प्राधान्य देतं हे दिसून येतंय,’ असंही ते म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांचे तीन दिवसांत चार मोठे दौरे!

News Desk

MPSCExam : राजकीय स्वार्थाला बळी पडू नका – आदित्य ठाकरे

News Desk

आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ   मार्गदर्शक हरपला:मुख्यमंत्री

swarit