HW News Marathi
Covid-19

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्ज, महागड्या यंत्रणा उभ्या राहतील, महापौरांची माहिती

मुंबई | संपूर्ण देश आज गेली दीड वर्ष कोरोना रुग्णाशी झुंझत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होतोय तोवर तिसऱ्या लाटेची आशंका दर्शवली जात आहे. डेल्टा प्लस विषाणू हा कोरोनाची तिसरी लाटेसाठी कारणीभूत असेल. मुंबई आर्थिक राजधानी या तिसऱ्या लाटेसाठी तयार असल्याची माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. अतिरिक्त जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. मुलांसाठी वेगवेगळे सुसज्ज सेंटर उभारण्यात आले आहेत. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशीच उभी ठेवण्यात येईल, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

काळजी घेतल्यास लाटेला रोखू शकतो

कोरोनाच्या रोगापासून वाचायचं असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय आहे. परंतु लसींच्या तुटवड्या अभावी लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत. हे खरं आहे. सध्या पहिल्या डोस घेतलेल्यांची संख्या ४९ हजारावर गेली आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या १३ लाखावर गेली आहे. कालच आपल्याला १ लाख ३५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. उद्याही काही लसींचा साठा उपलब्ध होणार आहे. असाच लस पुरवठा सतत होत राहिला तर लसीकरणाच्या मोहिमेला गती येईल. रुग्ण संख्या रोखण्यात यश येत आहे, असं सांगतानाच तरीही थोडी काळजी घ्या. तिसऱ्या लाटेचं संकट आहे. पण काळजी घेतल्यास आपण या लाटेला रोखू शकतो, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत.

व्यापारी वर्ग आक्रमक

व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. सगळ्यांचंच नुकसान होत आहे. परंतु, अजूनही काही वॉर्डात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. दोन तीन दिवसात यावर काही तरी निर्णय होऊ शकतो, असे संकेत देतानाच काही राजकीय पक्षांकडून व्यापाऱ्यांना उकसवलं जात आहे. व्यापारी संघटनांच्या मागे वेगळे चेहरे आहेत. दबाव तंत्रात लोकांच्या जीवाची पर्वा केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. ते चांगला मार्ग काढतील, अशी आशा आहे, असंही त्या म्हणाल्या.

व्यापारी वर्गाच्या मागण्या सरकारने फेटाळल्याने आक्रमक व्यापाऱ्यांनी आता सरकारला इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास, या शनिवार आणि रविवारीसुद्धा सुद्धा दुकान उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला असून नियमांमध्ये शिथिलता मिळत नसल्यानं व्यापारी आक्रमक झाले आहेत. नियमांमध्ये शिथिलता न मिळाल्यास वोटिंगवेळी दाखवू, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी सरकराला इशारा दिला आहे.

सरकारने दुकानांबाबत लादलेल्या निर्बंधांमुळे दादर व्यापारी संघ आक्रमक झाला आहे. शनिवार रविवार अनेकांना सुट्टी असताना ज्या दिवशी लोक खरेदीला येतात. त्याच दिवशी दुकान बंद असल्याने याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे. शिवाय, सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ग्राहक दुकानात फिरकत नसल्याने ही वेळ ७ ते ७ तरी किमान वाढवून द्यावी अशी मागणी दादर व्यापारी संघाने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! मुंबईत २९ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण

News Desk

दिलासादायक : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोविड-१९ च्या लसीबाबत एक आनंदाची बातमी

News Desk

देशात गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू

News Desk