HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई | महाविकासआघाडी मध्ये कुरगोडही सतत चालूच असतात. सध्या महाविकासमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वादावादी सुरु असून एकमेकांवर टीकाकरण सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे.

नवीन वादाला सुरुवात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यापासून महाविकास आघाडीत वक्तव्यांची मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात. शिवसेनेला कामाला लागा म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले चालते. मी स्वबळाची भाषा बोलू लागलो, तर त्रास होतो. हे योग्य नाही. स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम आहे”, असे मत त्यांनी मांडले.

स्वबळावरच निवडणूक लढवणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत आपलं मत व्यक्त केला आह. “मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही”, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला. यावेळी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या दबावानंतर शासकीय कार्यालयातील देवदेवतांच्या प्रतिमांचा निर्णय रद्द होणार

News Desk

राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नाही का?, चित्रा वाघ यांची टीका

News Desk

आषाठी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी, अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

News Desk