HW News Marathi
Covid-19

कोल्हापुरात व्यापार होणार सुरु, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

कोल्हापूर | राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (१६ जुलै) कोल्हापूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांशी भेट घेऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने सोमवारपासून शहरातील सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी देऊ, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी सरसकट व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीला टोपेंनी दुजोरा दिला आहे.

पॉसिटीव्हिटी रेट झाला कमी

कोल्हापुरात आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात सगळी दुकाने सुरु करण्याचा निर्णय दिला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या सुचनांचं पालन करावे लागणार आहे. सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात व्यापार सुरू करण्यास परवानगी दिल्याने व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

व्यापारी वर्ग का नाराज होता?

कोरोनाच्या काळात, लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे उद्योग क्षेत्राला त्याचा फटका बसला. कित्येक व्यापार बंद पडले आणि कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. देशात कोरोना थैमान घालत असल्याने निर्बंध लागू आहेत. अजूनही व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली गेलेली नाही. कोल्हापुरात राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने ‘माझा व्यापार, माझी जबाबदारी’ हे नवीन धोरण स्वीकारलं आहे. कोल्हापूर महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्ष ललित गांधी यांनी व्यापाऱ्यांची परीक्षा न पाहता काय तो निर्णय द्यावा अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करोनाची तिसरी लाट; पुढील तीन महिने महत्त्वाचे, केंद्राचे राज्यांना तयार राहण्याचे निर्देश

News Desk

नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क न लावण्याचा विचारही करू नये !

News Desk

राज्यसरकार नुकसानग्रस्तांना मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं!

News Desk