HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखालून दोघांचे प्राण वाचवण्यात यश

ठाणे | कळवा येथील घोलाई नगर परिसरात तीन घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. घोलाई नगर परिसरात चर्चच्या बाजूला असलेल्या तीन घरांवर आज (१९ जुलै) अचानक दरड कोसळली. याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. यावेळी टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या ढिगाऱ्याखालून दोन जणांना जिवंत बाहेर काढले. तर या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

८० वर्षाचा योध्दा शेतकर्‍यांची दु:ख समजून घेण्यासाठी त्यांच्या बांधावर,पहिल्या दिवशी दहा ते बारा नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी !

News Desk

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

News Desk

हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप!

News Desk