HW News Marathi
महाराष्ट्र

कळव्यात घरांवर दरड कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही!

कालवा। कालव्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. कळवा पूर्व येथील इंदिरानगरातील माँ काली चाळीवर काल(७ ऑगस्ट) रात्री दरड कोसळली. त्यात सहा घरांचे नुकसान झालं आहे. तर २५ घरातील कुटुंबांचं तातडीने स्थलांतर करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळवा पूर्व भागातील इंदिरानगरमधील माँ काली चाळ येथील घरांवर दरड कोसळून सहा घरांचे नुकसान झाले आहे. काल रात्रीच्या वेळी ही घटना घडली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी २० ते २५ जणांना गोलाई नगर येथील ठाणे महापालिका शाळेत हलविले आहे.

कोणतीही जीवित हानी नाही

दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मातीचा ढिगारा उपसण्यात येत आहे. डोंगराळ भागात ही वस्ती असल्याने या परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता तर नाही ना? याचीही तपासणी करण्यात येत आहे. याच परिसराच्या काही अंतरावर घोलाईनगर भागात दरड कोसळून 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने ठाण्यातील डोंगरपट्यांमधील भागात नोटिसा देखील बजावल्या होत्या.

पुनर्वसनाची मागणी

भूमाफियांमुळे अशी घरे डोंगर भागात उभारण्याचे काम होत आहे. त्यांच्यावर पहिली कारवाई करावी, अशी मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याच बरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देखील या भागात पाहणी केली होती. तर दुसरीकडे राज्य सरकारने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येणार आहे का?, असा संतप्त सवालही या नागरिकांनी केला आहे.

दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच

पावसामुळे दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. या आधी महाड तालुक्यातील तळीये आणि चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. पावसाळ्यात डोंगराची जमीन खचून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच दरड प्रवण क्षेत्राची पाहणीही शासनाकडून केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे! – वर्षा गायकवाड

Aprna

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडणार हे केवळ स्वप्नरंजन

News Desk

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna