HW News Marathi
महाराष्ट्र

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडणार हे केवळ स्वप्नरंजन

मुंबई | शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनातून सडकून टीका केली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीला होणाऱ्या दिरंगाईवरुन राऊत यांनी अग्रलेखातून आपल्या रोखठोक या सदरात राज्यपालांना लक्ष्य केले आहे. तसेच ही परिस्थिती राजकारणातील नवी आणीबाणी असल्याचा आरोप देखील केला आहे

काय म्हणाले संजय राऊत ?

“विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ जागा भरायच्या आहेत. या जागांचे राजकारण आताच सुरु झाले आहे. सरकारने शिफारस केलेले १२ सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे. महाराष्ट्रातील ३ प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले व त्यांनी १०५ आमदारांचा सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला दूर ठेवून सरकार बनवले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांत या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांची वाटणी होईल. हे १२ सदस्य कोण व त्यांची नेमणूक राज्यपाल करतील काय ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.”

“गृहखात्याचे काम कायदा-सुव्यवस्था, राष्ट्राची, राज्याची सुरक्षा राखणे हे प्रामुख्याने असते. पण गृहखात्याकडे पोलीस, गुप्तचर, राजभवनाचा ताबा असतो. राजकारणासाठी त्यांचा सर्रास वापर ५० वर्षांपासून सुरुच आहे. त्यामुळे पहाटेच सरकारचा शपथविधी करुन घेणारे राज्यातील नामनियुक्त १२ जागांचे राजकारण नक्कीच करतील व सर्व प्रकरण शेवटी राज्यपालांवर ढकलून नामानिराळे राहतील. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने हे सदस्य निवडू शकत नाहीत. ही यादी मंत्रीमंडळाकडून ठरवली जाते. ती यादी राज्यपालांना बंधनकारक असते, असे आपले संविधान सांगते. पण राज्यपाल या यादीवर निर्णय घेण्यास जास्तीत जास्त विलंब करतील. राज्यपाल व गृहखात्याच्या हातात सध्या इतकेच आहे,” असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी सरकार पाडणार असल्याचा दावा करणाऱ्यांचाही या लेखात समाचार घेतला. “कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. हे खरे असेल तर १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त जणांच्या नेमणूका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे!”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू’, निलेश राणेंची राऊतांवर गंभीर टीका  

News Desk

संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेने ठेवले दुधात

News Desk

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

News Desk