HW News Marathi
महाराष्ट्र

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाही, ठाकरे सरकार निर्णयावर कायम – उदय सामंत

मुंबई | कोरोनाच्या संकट काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी युजीसीने सांगितले होते. मात्र, राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अशक्य असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आधीही सांगितले होते. आज (१३ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये ठाकरे सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा निर्णय झाला.

महाराष्ट्रासह ६ राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गुणवत्ता आणि भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. राज्यात कंटेंटमेंट झोन आहेत, तर अशा भागात परीक्षा कशा घेणार? आणि काही महाविद्यालये अजूनही कोरंटाईन सेंटर आहेत. त्यामुळे राज्यात जी १२ हजार कंटेंटमेंट झोन आहेत तेथील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार हा प्रश्न आहेच. सध्या परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे असेच होणार.

पालकांचा देखील याला विरोध आहे. त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून २ वेळा युजीसीला विनंती केली आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि युजीसीने याची दखल घ्यावी, अशी विनंती उदय सामंत यांनी केली. बंगळूरमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या त्यांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे त्यांच्या जीवाशी खेळू नका, असे उदय सामंत म्हणाले.

‘परीक्षा रद्द झाल्या तरी अभ्यास करा, आरोग्याची असुविधा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत’, या वक्तव्यावर सामंत यांनी जोर दिला. मुंबई, पुणे आणि इतरही ठिकाणी महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांचं रुपांतर कोरोना रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहेत. त्यामुळं विश्लेषण आणि आढावा घेतला असता परीक्षा घेणं शक्य नसल्याचा निष्कर्ष समोर येतआहे, शिवाय कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे त्यामुळं अखेर आधीच्याच निर्णयावर महाराष्ट्र राज्य सरकार ठाम आहे.

अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांमसमवेत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही कुलगुरुंशी शासन स्तरावर चर्चा झाली. असून, त्यांच्याही आरोग्याचा विचार करत सध्या कोणत्याही परीक्षांचा निर्णय नाही हे पत्रकार परिषदेदरम्यान सामंत म्हणाले.

राज्यात वाईन शॉप सुरु करण्याला परवानगी देण्यात येते मग परीक्षांना का नाही, या मुद्द्यावरुन होणाऱ्या विरोधावरही त्यांनी यावेळी थेट शब्दांत उत्तर दिलं. ‘वाईन शॉप आणि विद्यापीठांची तुलना नको. परीक्षा घेणं हे तर देशाच्या भावी पिढीला कोविडसमोर उभं करण्यासारखं आहे. शिवाय पालकांनीही परीक्षांना विरोध दर्शवला आहे. आपल्या पाल्यांच्या आरोग्याचीच त्यांना काळजी आहे, याचाच विचार सरकारनं केला’, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एक परिपूर्ण संकुल ठरेल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

पुण्यातील व्यापाऱ्याला जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटक

News Desk

हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk