HW News Marathi
महाराष्ट्र

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई | अलीकडे मी ऐकतोय भोंगे फुकट वाटण्यामध्ये पुढाकार घेत आहेत. मागच्या ५ वर्षांमध्ये भोंगे नव्हते का? आणि तेव्हा अजान होत नव्हते का? हजारो वर्षांपासून अजान होते आणि त्यावर अनेकवेळा वादविवाद झालेले आहेत, असे अनेक सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप प्रसार माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. भाई जगताप यांनी आज (४ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  

भाई जगताप म्हणाले, “अशाप्रकारचे भोंगे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात कधी वाटले गेले नाहीत. गॅस दरवाढ तसेच महागाईच्या आगडोंबविरोधात वाटले गेले नाहीत. सर्वसामान्य जनता आज महागाईतून पिसून निघते आहे, असे म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस किंवा मुंबईचे अध्यक्ष आणि नेते काहीच बोलले नाहीत. बीएमसीच्या निवडणूका लक्षात ठेवून अशा प्रकारचा डुप्लिकेटपणा करत आहेत.

मुंबईकरांना यांचा डुप्लिकेटपणा माहीत असून मुंबईकर फसले जाणार नाहीत. मेट्रो ही काँग्रेसची देण आहे. मेट्रोच्या सर्व ९ फेसेसची संकल्पना आणि रचना फार जुनी आहे. दिल्लीच्या मेट्रो संकल्पनेतून संपूर्ण देशाला मेट्रोसाठी प्रेरणा मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अखेर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख केला दुरुस्त!

News Desk

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या १५८ बसचालकांना घरी पाठविले

swarit

मुख्यमंत्री पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी रवाना

News Desk