HW News Marathi
महाराष्ट्र

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊन जाहीर केला आहे. यादरम्यान देशातील नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून केले जात आहे. तर दुसऱ्या बाजुला प्रसिद्ध उद्योगपती कपिल आणि धीरज वाधवान यांनी सरकारच्या नियमांची पायमल्ली करत मुंबईहून महाबळेश्वरला पोहोचले. यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका होती आहे.

राज्यात सध्या लॉकडाऊन आणि संचार बंदी असूनही उद्योगपती वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी मिळते कशी, या कुटुंबीयांना एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असे कृत्य करेल, हे शक्य नाही. मग नेमक्या कोणाच्या आदेशाने कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी मिळली, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विधानसेभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

वाधवान कुचुंबावर येस बॅंकेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामूळे त्यांना परवानगी शिवा कोठेही जाण्यास मनाई आहे. त्यातची कोरोनामूळे लॉकडाऊन असल्याकारणाने कुठेही जाण्यास बंदी आहे. परंतू, लॉकडाऊनचा काळ हा सुट्टीचा काळ असल्यासारखा त्यांनी गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांच्याकडून परवानगीचे पत्र मिळवत २३ जणांसह महाबळेश्वरला सुट्टीसाठी गेले. सध्या या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ान कुटुंबावर गुन्हा दाीस अधिश्रोर

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अहमदनगर महापालिकेसाठी भाजपची जोरदार तयारी’, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत बैठक!

News Desk

पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर सरसावले!

News Desk

आम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले, पण ते धुर्त होते!, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

Aprna