HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही!, ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | “भाजप सोडले म्हणजे काय हिंदुत्व नाही सोडले. भाजप म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचे पेटेट घेतलेले नाही,” असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी आज (१० एप्रिल) कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातू जनतेशी संवाद साधताना. भाजप आणि पंतप्रधान तोफ डागली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आता राहिली नाही, अशी टीका कोल्हापुरातील सभेत केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “महापुरानंतर मी आणि फडणवीस एकाच ठिकाणी पाहणी केली होती. आम्ही काय केले, काय नाही ते जनतेसमोर होऊ दे म्हणून गेलो होतो. बेंबीच्या देटापासून भाजपवाले ओरडून सांगत होते. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचे पेटेट घेतलेले नाही. २०१४ साली आमचा समझोता होत असताना अचानक युती तोडली देखील होती. २०१९ साली युतीत असताना भाजपची ४०  हजार मते कुठे गेली? गेल्या वेळी तुम्ही छुप्या पद्धतीने काँग्रेसला मदत केली होती की नाही सांगा,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

फडणवीस नेमके काय म्हणाले

शिवसेनेच्या विभाग प्रमुखाने उर्दुमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाव छापले. त्यावेळीच हिंदुत्ववादी असलेली शिवसेना ही आता सुडो सेक्युलर झाली, अशी टीका फडणवीसांनी कोल्हापुरातून शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका केली आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक घोटाळ्याला क्लिन चिट | धनंजय मुंडे

News Desk

अखेर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

Aprna

नाशिकच्या कांद्या व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे, कांद्याचे दर पन्नास टक्क्यांनी घसरले

News Desk