HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत वीज पुरवठा खंडित का झाला याची चौकशी करावी, मुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्र्यांना निर्देश

मुंबई | मुंबईत आज (१२ ऑक्टोबर) अचानक पूर्णपणे वीज खंडीत झाल्यामुळे गोंधळ झाला होता. नेमकी मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत असे का झाले याची चौकशी करावी असे निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. दादर, लालबाग, परळ, अंधेरी, वांद्रे यासह अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडी झाला. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. जवळपास अडीच तासानंतर मुंबईतील वीज पुरवठा एक एक भागात सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत, तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा रंग भगवाच आहे आणि आमचा अंतरंग सुद्धा भगवाच !

swarit

राजीनामा घेण्यात आला नाही तर मी स्वतः दिला, राठोडांचा नविन प्लान

News Desk

राज्यात काल 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू!

News Desk