HW News Marathi
महाराष्ट्र

“फडणवीसांच्या काळातील जीआरप्रमाणेच दुर्घटना ग्रस्तांना होणार मदत”, विजय वडेट्टीवार…!

पुणे। महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने हाहाकार माजवला अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले, आणि याच पार्श्वभूमीवर आता पूरग्रस्तांना तातडीने आणि भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांसह पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांकडूनही तसं आश्वासन देण्यात आलं आहे. अशावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 2019च्या जीआर प्रमाणे पूरग्रस्तांना मदत दिली जाणार अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

अजित पवार यांनी केली पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. भिलवडीमध्ये बोटीच्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्त भागातील स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यानंतर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जयंत पाटील, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार उपस्थित आहेत.

पाणी ओसरलं तर कोल्हापूरला चक्कर मारेन

पाऊस होता त्यामुळे मी बायरोड सांगलीला आलो. सांगलीची पाहणी आणि बैठक करून साताऱ्याला जाणार. साताऱ्याची पाहणी आणि बैठक करून पुण्याला जाणार. पण तोपर्यंत हेलिकॉप्टर मिळालं आणि प्रशासनाने परवानगी दिली तर कोल्हापूरलाही चक्कर मारेल. कारण कोल्हापूरचा रस्ता अजूनही बंद आहे. पुलावरून पाणी ओसरलं आणि जाण्यासाठी मार्ग मिळाला तर जाईन. मी सकाळीच कोल्हापूरला जाणार होतो, असं अजित पवार म्हणाले.

सांगलीकडे रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सांगलीत अनेक ठिकाणी मोटारीने प्रवास करून पाहणी करणार आहेत. पलूस येथे पाहणी केल्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते साताऱ्याच्या दिशेने जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान’!, नवाब मालिकांचा संताप

News Desk

औरंगाबादमध्ये ४८ तास इंटरनेट सेवा रहाणार बंद

News Desk

#Coronavirus | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राजकीय नेतेही सामान्य जनतेसोबत

swarit