HW News Marathi
महाराष्ट्र

‘दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्याची शक्यता’, अस्लम शेख यांची माहिती!

मुंबई। ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा असावी, असं विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी अस्लम शेख यांनी हे मोठं विधान केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होऊ शकते. तसंच लोकल प्रवासाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

परवानगी मिळावी

याबाबत अस्लम शेख म्हणाले, “ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना लोकल, बस, एसटी किंवा दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी या मताचा मी आहे. तशी मानसिकता आमच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होईल”,

मॉल, दुकानं आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी जर दोन डोस घेतले असतील तर त्यांना अधिक मुभा कशी देता येईल, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होईल, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.केंद्राने 700 कोटींची जी मदत दिली आहे, ती मागील वर्षांची आहे. सध्या राज्यात जो पूर आला, त्या पूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईच्या पॅकेजबाबत आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालय सुरु आहेत. सर्वाना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रातून विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘या’ केल्यात मागण्या!

News Desk

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे, त्यांनी राग मानून घेऊ नये – जयंत पाटील  

News Desk