HW News Marathi
Covid-19

“महाराष्ट्रात लॉकडाऊन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल”, राष्ट्रवादीचं मत

मुंबई | राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून ठाकरे सरकार लॉकडाऊन वाढवणार की उठवणार यासंबंधी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर निर्बंध जाहीर केले असून परिस्थिती नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन वाढवण्यात आला होता.

पण सध्या रोजची रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाउन शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाउन उठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे.

लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल

“राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्रात कोरोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले होते की,“सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने पेन्शनधारकांच्या महगाई भत्त्याला दिली स्थगिती

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ५४,७३६ नव्या कोरोना रुग्णांची भर

News Desk

अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमीत भक्तांना जाण्यास बंदी, घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन 

News Desk