HW News Marathi
Covid-19

राज्यात ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता

मुंबई | महाराष्ट्र कोरोना रुग्णांनी २५ हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे रुग्णांच्या  संख्येत वाढ होत आहे. देशातील तिसरा लॉकडाऊन हा १७ मे रोजी संपणार आहे. मात्र, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१२मे) जनतेशी संवाद साधताना चौथ्या लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज (१४ मे) सर्व मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवावा, अशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

मोदी यांनी देशात चौथ्य टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन चौथे नव्या नियमांसह लागू केला होणार असून आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. १८ मे पूर्वी लॉकडाऊन चारची माहिती दिली जाईल, असे मोदींनी सांगितले. मात्र, देशातील चौथ्या लॉकडाऊन नव्या स्वरुपात असून याचे नियम वेगळे असतील असेही त्यांनी  सांगितले. यामुळे आता देशवासियांचे लक्ष हे चौथ्या लॉकडाऊनकडे लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ कोरोना बाबतीत अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करा”

News Desk

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कोरोनावर यशस्वी मात !

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९८५१ नवे रुग्ण, तर २७३ जणांचा मृत्यू

News Desk