HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊनचे योग्य नियोजन नाही, सोनिया गांधींची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, मोदींचा हा लॉकडाऊनचे योग्य नियोजन केले गेले नाही. यामुळे देशभरातील लाखो मजूर आणि कामगार यांना खूप हाल सहन करावे लागेल, असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी आज (२ एप्रिल) माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचा समावेश करत बैठक घेतली. यावेळी लॉकडाऊनच्या घोषणनंतर देशभरातील वाहूतक सेवाही बंद करण्यात आली. त्यामुळे लाखो मंजूर आणि कामगार शकडो किलोमीटर पायी घरी जाताना दिसत आहे.

काँग्रेसच्या नेतेमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकंटसमयी पुढे यायला हवे आणि मदत करायला हवी, असा सल्ला सोनिया गांधींनी दिला. लॉकडाऊनमुळे आज देशातील मध्यम व लघु उद्योगांसंबंधी कोट्यवधी लोकांच्या बेरोजगार झाले असून छोटे व्यापारीही रस्त्यावर आला आहे. यामुळे यांच्यासाठी सरकारने पॅकेजची घोषणा करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजे, उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांची मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक

News Desk

एक राजा तर बिनडोक, दुसऱ्या राजाची आरक्षणाची भूमिका बरोबर – प्रकाश आंबेडकर

News Desk

आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा अडचणीत!

News Desk