HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय आता पर्याय उरला नाही,सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१० एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक सुरु असून यात सर्व विरोधी पक्ष उपस्थित आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. दरम्यान, राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा लक्षात घेता ता लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी ९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून अध्याप १२०० मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय असेल असं सांगितलं. ते बारामतीत कोरोना आढवा बैठकी नंतर बोलत होते. दरम्यान, राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत भाजपने विरोध दर्शवला आहे. निर्बंध असावे असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

बैठकीतले महत्वाचे मुद्दे :

लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – उद्धव ठाकरे

रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आलीये

रेमडेस्विर आणि ऑक्सिजनचा तुटवडा

ऑक्सिजन, बेड लवकर उपलब्ध करा – फडणवीस

रेमडेस्विर तात्काळ द्या – फडणवीस

मागचं वर्ष वाया गेलं – फडणवीस

राज्य सरकाराल पुर्ण सहकार्य करु – फडणवीस

निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या

कडक लॉकडाऊनची गरज नाहीतर १५ तारखेनंतर भीषण परिस्थीती

सरसकट लीकरणाची गरज

सगळ्यांनी एकत्र यायची गरज, राजकारण करु नका- मुख्यमंत्री

राज्याचं कर्ज वाढलं तर वाढू द्या – फडणवीस

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांनीही कोरोनाचे संकट पाहता रयतेच्या रक्षणासाठी कठोर निर्बंध लावलेच असते – सामना

News Desk

इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी बंद 

News Desk