HW News Marathi
महाराष्ट्र

#MahalaxmiExpress : सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका

मुंबई | बदलापूर आणि वांगणीदरम्यान पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या १ हजार ५० प्रवाशांना एनडीआरएफने सुखरूपणे बाहेर काढण्यात आले आहे. तब्बल १५ तास प्रवाशी एक्स्प्रेसमध्ये अडकले होते. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सर्वांसाठी जेवणा आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सर्व प्रवाशांना १४ बस आणि ३ टेम्पोद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी येणार आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये ९ गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी नेहण्यात आले आहे. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तेथेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांमध्ये काल (२६ जुलै) रात्रीपासून अडकली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्या होणार युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

News Desk

मागासवर्ग आयोगाने वानखेडेंची चौकशी करणारी एसआयटी रद्द करण्याचे दिले आदेश

Aprna

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेची पाटी कोरीच राहणार?

News Desk