HW News Marathi
महाराष्ट्र

कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल ३ तासांनी पूर्ववत

मुंबई | मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ट्रेन विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील वीर आणि माणगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीने धोक्याची पातळी शनिवारी (२७ जुलै) सकाळी घोड नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. तीन तासानंतर पुन्हा वाहतूक सुरु झाली असून कोकण रेल्वेच्या गाड्या धीम्या गतीने धावत आहेत.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर वीर स्थानकात थांबवण्यात आली आहे. तर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर कोलाड स्थानकात थांबवण्यात आली आहे. मंगला एक्स्प्रेस करंजाडी स्थानकात थांबवण्यात आली आहे. तर सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस रोहा स्थानकात थांबवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

९वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

News Desk

HW न्यूजचा इम्पॅक्ट! पंकजा मुंडेंनी पिडीत कुटुंबाची घेतली भेट

News Desk

९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात

News Desk