HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा पहिला बळी, मुंबईत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा कोरोना बाधित रुग्णावर मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा कोरोनाग्रस्ताचा आज (१७ मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा जेष्ठ नागरिक व्यापारानिमित्त दुबईला गेले होता. दुबईवरुन मुंबईत परतल्यानंतर तो जेष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्ताच्या आकडा ३९ वरून ३८ वर आला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १२८ वर गेला आहे.

तसेच “राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना हे जागतिक संकट आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. “राज्यात धोक्याची वेळ आलेली नाही मात्र, काळजी घेण्याची गरज आली, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. “राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धार्मिक, स्थळांना गर्दी होऊ देऊ नका, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. ग्रामीण भागातील सर्व शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास करू नये,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी काल (१६ मार्च) पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनामुळे मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिक हा व्यावसयिक असून ते दुबईला गेले होते. कुटुंबातील पत्नी आणि मुलाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. देशात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. यापूर्वी कर्नाटकात पहिला तर दिल्लीत दुसरा बळी गेला आहे. हा ज्येष्ठ नागरिक ६ मार्चला दुबईहून मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते हिंदूजा रुग्णालयात ८ मार्चला दाखल झाले. यानंतर ज्येष्ठ नागरिकांची १२ मार्चला कोरोनाची तपासणी करण्यात आली. या ज्येष्ठ नागरिकांना १३ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळली. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशी आहे

  • पिंपरी चिंचवड मनपा- ९
  • पुणे मनपा- ७
  • मुंबई – ५, कस्तुरबा रुग्णालयात १ रुग्णाचा मृत्यू
  • नागपूर- ४
  • यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण-प्रत्येकी ३,
  • रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद- प्रत्येकी १

एकूण 39 रुग्ण

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारनं करून घेऊ नये” – विनोद पाटील

News Desk

भाजप नव्हे मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल !

News Desk

विधानपरिषद उपसभापती पदासाठी सेना आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

News Desk