HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रबंदची हाक दिली नसती तरीही महाराष्ट्र स्वयंस्फुर्तीने बंद झाला असता ”रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

मुंबई | प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र बंद झाला ही बाब खरी असली तरीही त्यांनी घोषणा दिली नसती तरीही महाराष्ट्र स्वयंस्फुर्तीने बंद झालाच असता, अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टीऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरयांना प्रत्युत्तर दिले आहे.

मात्र दलित ऐक्य झाले पाहिजे असे सांगत त्यासाठी एखादा फॉर्म्युला तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सोमवारी मुंबईतील नायगाव येथे रिपाईच्या वतीने आयोजित केलेल्यासामाजिक सलोखा रॅलीमध्ये ते बोलत होते. आज आरपीआयची निघाल्यामुळे सलोखारॅली, जागी झाली आहे दादर आणि नायगाव ची रॅली, माझा भीम होता दलितबहुजनांचा वाली. या आपल्या स्वरचित कवितेच्या ओळी म्हणत त्यांनी नेहमीच्याशैलीत आपल्या भाषणाची सुरूवात केली. भीमा कोरेगाव प्रकरणात पोलीसांनी चांगली कामगिरी केल्याचे प्रशस्तीपत्र देतानाच त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी काही सवाल उपस्थित केले. ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या आहेत, हे तपासण्याचीगरज आहे. कारण आलेल्या दलितसमाजाला पाणी प्यायला मिळू नये म्हणून दुकाने बंद करण्यात आली, असा दावा करत त्यांनी या ग्रामपंचायतीत सत्तेवरअसलेल्या पक्षांच्या हेतुवरच प्रश्न उपस्थित केले. या आंदोलना दरम्यान मराठा समाजातील एका तरुणाचा दुर्दैवीमृत्यू झाला.

मात्र त्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याही काही लोकांनी पोलिसांवर हल्ले केले म्हणून पोलिसांनी 307 चे गुन्हे दाखल केल्याचे ही ते म्हणाले. आपल्या भाषणात मा. आठवले यांनी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत काही समाज कंटकांनी केलेल्या मागणीचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाला धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान बदलणार नाही हे निश्चित आहे. मात्र तसा प्रयत्न झाल्यास आपण ते कधी बदलू देणार नाही, उलट त्यांनाच आम्ही बदलूनटाकू.

भाजपचे एक केंद्रीय मंत्री हेगडे यांनीदलित समाजाबद्दल जे वक्तव्य केले, त्यांच्या मताशी आपण अजिबात सहमत नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. तसेच कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही अट्रोसिटी कायदा ही कधीही रद्द होणार सल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर जो महाराष्ट्रबंद झाला, त्यामध्ये आपलेही कार्यकर्ते सामिल होते, असे सांगतानाच आठवले आता आऊट डेटेड झाले. त्यांचा जनाधार संपला असे म्हणणाऱ्यांनी आजचा हा उपस्थित जनसमुदाय पहावा, असे आवाहनही मा. रामदास आठवले यांनी भाषणाच्या शेवटी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहांचा नोव्हेंबरमध्ये मुंबई दौरा, शिवसेना-भाजप युतीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब ?

News Desk

राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत, राऊतांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया 

News Desk

‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोला

Aprna