HW News Marathi
Covid-19

बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्याने महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना मोठे दु:ख !

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून देशात बिहार पोलीस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असा वाद निर्माण झाला. यावेळी महाराष्ट्र भाजपची भूमिका ही सातत्याने महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधीच दिसली. याच पार्श्वभूमीवर, आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महाराष्ट्र भाजपला टोला लगावला आहे. “बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्याने महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. महाराष्ट्र भाजपला झालेले दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना!”, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना बोचरा टोला लगावला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर ही टीका केली आहे. “बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्यामुळे व त्याचवेळी महाराष्ट्राच्या पोलिसांना ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान करणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना”, असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि विश्वासार्हतेबद्दल भाजपच्या नेत्यांनी शंका उपस्थिती केली आहे.

देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. “महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण

Aprna

दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित;आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे – राजेश टोपे

News Desk

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk