HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus : घाबरून युद्ध जिंकता येत नाही, आपण जिद्दीने लढू !

मुंबई | आपण जागतिक युद्ध लढत आहोत. घाबरून युद्ध जिंकता येत नाही, पुढे जिद्दीने लढले पाहिजे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज (१९ मार्च) वर्चुअल पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे. राज्यातील परिस्थिती गंभीर नाही, परंतु चिंताजनक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, “ही वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. सध्या राज्यात लोकल ट्रेन आणि बसची गर्दी कमी झाली आहे. मात्र अजून गर्दी ओसरण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना पत्रकार परिषदेद्वारे दिले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. सध्या राज्यात कोरोना बाधितांचा आकडा ४७ वर गेला आहे. यामुळे राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे. राज्यातील परिस्थिती गंभीर नाही, परंतु चिंताजनक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

कोरोनाची लक्षणे लपवून नका | मुख्यमंत्री

दरम्यान, राज्याची यंत्रणा कोरोनाशी लढण्यास सज्ज असून राज्यात जीवनावश्यक वस्तूचा पुरेसा साठा,असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. तसेच राज्यातील नागरिकांनी सुरक्षित राहा, घरतून बाहेर पडू नका,” अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची लक्षणे लपवून नका, तपासणी करू घ्या, अशी सुचना मुख्यमंत्री केल्या आहेत. कोरोनाग्रस्त रुग्ण अपराधी नाही. तसेच कॉरेंटाईन केलेल्या व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प मारलेला आहे. मात्र, स्टॅम्प मारलेल्या व्यक्तींनी घरातून बाहेर फिरण्याची गरज नाही, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी वर्चुअल पत्रकार परिषदेतून दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

  • वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले पाहिजे
  • कोरोना संकटावर एकुटीने आपण कोरोनाव मात करू या
  • राज्यात कोरोना तपासणी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.
  • कोरोनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे गरज आहे
  • कोरोनाग्रस्त रुग्ण अपराधी नाही, स्टॅम्प मारलेल्या लोकांनी बाहेर फिरण्याची गरज नाही
  • कोरोनाची लक्षणे लपवून नका, तपासणी करू घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री केली
  • आपण सुरक्षित राहा, घरतून बाहेर पडू नका,
  • लोकल, बसची गर्दी कमी झाली असून गर्दी अजून कमी होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
  • लोकांनी घरातून बाहेर पडू नये
  • मंदिर, चर्चा, मशीद बंद झाल्या आहेत
  • नागरिकांनी दिलेल्या सूचना पाळलेले पाहिजे
  • हे युद्ध विषाणूशी आहे
  • घाबरून युद्ध जिंकता येत नाही, जिद्दीने लढले पुढे पाहिजे
  • राज्यात जीवनावश्यक वस्तूचा पुरेसा साठा
  • कोरोनाशी लढण्यास राज्याची यंत्रणा सज्ज
  • आपण जागतिक युद्ध लढत आहोत

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

News Desk

प्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

News Desk

नागरिकत्व विधेयकाविरोधात शहांवर निर्बंध लादण्याची अमेरिकन आयोगाची मागणी

News Desk