HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : राज्यातील ‘ही’ चार शहरे येत्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर ही चार शहरे आजमध्य रात्रीपासून येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यात मुंबईतील लोकल आणि बस सुरुच राहणार आहे. या बंददरम्यान अन्नधान, दूध, मेडिकल यासारख्या जीवनावश्यक वगळता सर्व कार्यालय आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज (२० मार्च) वर्चुअल पत्रकार परिषेदतून घेतले महत्वाचे निर्णय घेतला आहे.

लोकल ट्रेन आणि बस सेवा तुर्तास बंद करणार नाही, या मुंबईच्या जीवन वाहिन्या आहे. या बंद केल्या तर आपल्या अत्यावश्यक सेवा खोळंबतील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, गर्दी कमी करण्याच्या आवाहनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसात मिळतोय, असे ते यावेळी म्हणाले. सरकारने आवाहन करू नये, लोकल ट्रेन आणि बसमध्ये गर्दी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावर म्हटले की, एमएमआरडी, पालिका असलेल्या चार शहरना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून कंपन्यांनी कर्मचाऱ्याचे किमान वेतन कमी करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ वर गेली आहे तर कोरोना बाधित जे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते, त्यातील काही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ५ रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल, मात्र, या पाच जणांना पुढील १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जगण्यासाठी संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. प्रत्येक जण जगाण्यासाठी धडपड करत असतो, पण, आता सर्व जण जगण्यासाठी घरात राहत आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

कोरोनापासून बचावासाठी हे करा ,हे करू नका..डॉ.तात्याराव लहाने

मुख्यमंत्र्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय

  • ३१ मार्चपर्यं त राज्यातील ४ शहरे बंद करण्याचा सरकारचा निर्णय, यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिचवड आणि नागपूर या शहराचा निर्णय सरकारने घेला आहे
  • बस लोकल मधील गर्दी कमी झाल नाही तर
  • आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तयारी सुरू
  • कंपन्यांनी कर्मचाऱ्याचे किमान वेतन कमी करू नये
  • माणुसकीयच्या आधारावर आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे
  • महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद
  • अन्यधान, दूध, मेडिकल सुरू राहणार
  • शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के उपस्थितीचा निर्णय
  • जीवनावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालय बंद
  • जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकाने बंद करणार
  • अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा. पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार?
  • लोकल, बस सेवा बंद केल्यातर अत्यावश्यक सेवा खोळंबतील
  • तूर्तस लोकल, बस सेवा बंद करणार नाही
  • पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे.काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.
  • गर्दी न करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसात मिळतोय
  • प्रत्येक जण कोरोनाविरोधात लढत आहे
  • चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत. काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय .
  • जगण्यासाठी संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे
  • संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात राहवे लागत आहे
  • पण, आता सर्व जण जगण्यासाठी घरात राहत आहे
  • प्रत्येक जण जगाण्यासाठी धडपड करत असतो
  • संपर्क टाळा, हे शस्त्र आपल्या हाता आहे.
  • जागतिक युद्ध सुरु झाले आहे
  • घरामध्ये राहा, शांत राहा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !

News Desk

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार -मुख्यमंत्री

News Desk

गेंड्याच्या कातडीच्या सरकारने केलेली ही हत्याच आहे | धनंजय मुंडे

News Desk