HW News Marathi
Covid-19

राज्यात गेल्या २४ तासांत २२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

मुंबई । राज्यात दररोज कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (१४ सप्टेंबर) रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, “राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल २२ हजार ५४३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ११ हजार ५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दरदिवशी होणारी कोरोनाबाधितांची ही वाढ राज्यापुढचे मोठे आव्हान ठरत आहे.

राज्यासाठी दिलासादायक बाब अशी की, राज्यात आतापर्यंत एकूण ७ लाख ४० हजार 61 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत राज्यातील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची अर्थात ऍक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९० हजार ३४४ इतकी आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.०८% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दौंड-पुणे लोहमार्गावर प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल, सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

News Desk

छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये मद्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

News Desk

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा,आशिष शेलारांची मागणी

News Desk