HW News Marathi
Covid-19

चिंताजनक! दिवसभरात राज्यात ३९,५४४ नवे कोरोनाबाधित

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक होऊ लागली आहे. आज (३१ मार्च) दिवसभरात राज्यात ३९,५४४ नवे रूग्ण आढळले असून तब्बल २२७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार या मृतांसोबत राज्याचा मृत्यूदर १.९४ टक्के इतका झाला आहे.

आज दिवसभरात २३ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले असले, तरी राज्याचा एकूण Recovery Rate ८५.३४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे हळूहळू राज्य सरकारची चिंता आणि करोनाचा पुन्हा वाढता फैलाव रोखण्याचं आव्हान अशा दोन्ही गोष्टी अधिकाधिक तीव्र होऊ लागल्या आहेत.

राज्यात आज झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये सर्वाधिक ३१ मृत्यू हे नागपूरमध्ये झाले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात १८ मृतांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये हा आकडा १५वर गेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत मृतांची एका आकड्यावर असणारी संख्या आता दोन आकड्यांवर जाऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृतांचा आकडा ११ हजार ६९० वर गेला आहे. तर राज्यातील एकूण मृतांचा आकडा ५४ हजार ६४९ इतका झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’च्या संकटात संयमाचा ‘बारामती पॅटर्न’ दाखवूया-अजित पवार

Arati More

राज्यात काल ११ हजार ८७७ कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईत ८ हजार रुग्ण

Aprna

देशात गेल्या २४ तासांत ६०,९६३ नवे रुग्ण तर ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला 

News Desk