HW News Marathi
महाराष्ट्र

निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीबाबत प्रश्न करणारे फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही !

मुंबई | तुम्ही नवीमुंबईतील भतीजाच्या एका ३०० कोटीच्या जमीन व्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली त्यावेळी ती चांगली होती आणि आता आमच्या सरकारने गठीत केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज (३१ मार्च) फडणवीसांच्या टिकेला उत्तर दिले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी केलेल्या आरोपावर सरकारने एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली असून तिला अधिकार नसल्याची टिका फडणवीस यांनी केली होती. त्या टिकेचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला आहे.

एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची ही समिती ६ महिन्यात आरोपांची चौकशी करुन अहवाल सरकारला सादर करेल असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी नवी मुंबईतील भतीजा जमीन व्यवहारात अशीच एक निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने चौकशी केली होती. स्वतः समिती गठीत केली त्यावेळी ती ठिक आणि आमच्या सरकारने गठीत केली तर ती अधिकार नसलेली ही दुतोंडी भाषा योग्य नाही. चौकशी झाल्यावर काय सत्य आहे ते बाहेर येईलच याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार

News Desk

चुकीचं काहीही केलं नाही, सोमय्या केवळ बदनामी करताहेत; अनिल परब यांचा दावा!

News Desk

सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Adil