HW News Marathi
महाराष्ट्र

…तर होऊ शकते कारवाई; जाणून घ्या होळी आणि धुलिवंदनाची नियमावली

मुंबई | राज्यासह संपूर्ण देशात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत असतो. पण गेली दोन वर्षे ही कोरोना आणि लॉकडाउनमध्ये गेली. त्यामुळे इतर सण, समारंभ, कार्यक्रमांसह होळीचा हा उत्सव सुद्धा साजरा करण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले होते. पण यंदाचं चित्र हे काहीसं बदलेलं पाहायला मिळतंय. कोरोना रुग्णांची संख्या आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. पण तरीही कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे यंदा देखील होळी आणि धुलिवंदनाच्या उत्सवासाठी राज्य सरकारकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

सध्या कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. तर राज्यातच नाही तर पूर्ण देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बहुतांश निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळेच राज्य सरकारनं होळी आणि धुलिवंदनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे. या नियमावलीनुसार सर्व नागरिकांना हे नियम पाळावेच लागणार आहेत. नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. तर होळीसाठी राज्य सरकारची नियमावली पुढीलप्रमाणे आहे.

होळी आणि धुलिवंदनासाठी नियमावली

● रात्री 10 च्या आत होळी लावणे बंधनकारक असणार आहे.

● तसेच डीजे लावण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.

● जोरात लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई केली जाणार आहे.

● राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जोरात लाऊड स्पीकर लावू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.

● त्याचबरोबर होळी साजरी करताना मद्यपान आणि उद्धट वर्तन केल्यावर सुद्धा संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

● मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवणे यासारख्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. 

● तर महिलांची खबरदारी घ्यावी. म्हणजेच होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींची कोणीही छेड काढणार नाही. याबाबत संबंधित मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.

● त्याचबरोबर कोणत्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये. तसेच आक्षेपार्ह बॅनर लावण्यात येऊ नये.

● धुलिवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याचे फुगे फेकू नये

● तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड करू नये. तसं केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

● कुठेही आग लागेल असे कृत्य करू नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू, नऊ जण जखमी

Gauri Tilekar

“…तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा”, खोतांची परबांवर टीका

News Desk

सोशल मिडियावरही बाप्पा मोरया!

News Desk