HW News Marathi
महाराष्ट्र

 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ!, दरेकरांची मागणी

मुंबई। महाराष्ट्र अराजकता पसरली असून यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे नेते प्रवीण दरेकर केले आहे. दरेकरांनी आज (२३ एप्रिल) भाजप नेत

मोहिम कंबोज यांच्यावर शिवसैनिकांनी काल (२२ एप्रिल) केलेल्या हल्ल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा गे दाम्पत्य आज मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करणार होते, परंतु शिवसैनिकांनी त्यांनी अडकल्यामुळे त्या मातोश्री जाता आले नाही, यावरून ही दरेकरांनी सरकारवर टीका केली.

दरेकर म्हणाले, “राज्यात अलीकडच्या काळातील परिस्थिती पाहिली तर सर्वत्र अराजकता पसरली आहे. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील संपूर्ण परिस्थिती आज भाजपची बैठक होणार आहे. याबद्दल काय करायचे यासंदर्भात निर्णय घेणार आहे.”

“राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे लोक कायदा सुव्यवस्था हाता घेत आहेत. महाविकासआघाडी सरकार हे गुंडगिरी पुरस्कृत सरकार आहे,” असा आरोप दरेकरांनी केला आहे. दरेकर पुढे म्हणाले, “मुंबई पोलिसांना निवेदन देणार असून शिवसेनेचे कार्यकर्ते राज्यात दहशतवादी पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात सरकारने याकडे लक्ष घालावे. या प्रकराला लवकरात लवकर आळा घाला, मुख्यमंत्री मुग गिळून गप्पा बसले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इको-फ्रेंडली साहित्याला मागणी, सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांची गर्दी

News Desk

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपलं राजकारण करायचं आहे, आघाडी सरकारवर भाजपचा निशाणा 

News Desk

“भाजपचे बेगडी मुंबई प्रेम!”, राऊतांची भाजपवर टीका

News Desk